Skip to main content

Posts

Showing posts from April, 2016

धुमाळवाडीचा धबधबा

          ते दिवस १२वीनंतरच्या सुट्टीचेे.साधारण जुलै महिना. महाराष्ट्रावर भीषण दुष्काळाचं सावट, आणि नुकतेच इंजिनीरिंगच्या ऍडमिशनचे राऊंड चालू झाले असतील. आमचं रोजचा दिनक्रम म्हणजे सकाळी ७ला उठणे.  त्यात ७ला उठणारे पठ्ठे २च - मी आणि ग्रुपचे  वैभव अर्थात आमचा कॅप्टन वैभ्या.  ग्राऊंडवर सर्व गँग गोळा करून २तास क्रिकेट खेळणे. हुशार म्हणवली जाणारी सगळी पोरं ग्राऊंडवर अगदी वेळेवर पोचणार. पण बाकीचांच्या आपल्या आपल्या तऱ्हा. ५मिनिटांत आलो म्हणून अर्ध्या तासाने येणार ग्रुपचे भाई अर्थात बॉबीशेठ. आता भाई म्हणल्यावर कुणी काय बोलू शकत नाही. गपचूप निम्मे निम्मे गडी वाटून घेऊन डाव सुरु. अर्धी इनिंग झाल्यावर डोळे चोळत चोळत पल्ल्या येणार. भाईंच्या नावाने शिल्लक असलेल्या आणि त्यात २-४ची अजून भर टाकून सगळे  त्याला लांबूनच ८-१० शिव्या देऊन तोंडसुख घेणार. तरी तोंडावर हावभाव शून्य. जग काही म्हणलं तरी आम्हाला कधी फरक पडला नाही. त्याबरोबर येणार ओप्या. गेममध्ये नाव शक्तिमान असलं तरी ओप्याची तब्येत पाहता काडी पहिलवानपण ह्याच्यासमोर दंड ठोकून जाईल अशी परिस्थिती. तरी ओप्याला मान. कारण आमचा बोलण्यात कुणीच हात धरू

वेड असावं

वेड असावं.. वेड असावं पळण्याचं साऱ्यांना सोबत घेऊन धावणारं, वेड असावं उडन्याचं अवघ्या गगनाला भेदणारं, वेड असावं प्रेमाचं एखाद्याच्या हृदयाला भिडणारंं, वेड असावं मैत्रीच दोस्तांच्या काळजात घर करणारं, वेड असावं जिंकण्याचं सगळ्यांची मनं ज़िंकणारं, आयुष्यात एकतरी वेड असावं, पाहून सर्वांना वेडं करून सोडणारं.. ©वृषाल भोसले

रिसेप्शन पार्टी

कॉलेजला असताना ७-८जणांचा ग्रुप आमचा, प्रत्येक जण अगदी जगावेगळा. कुणी गाण्यात लतादीदी, कुणी क्रिकेटमध्ये विराट, कुणी भाई  मन्या सुर्वे , कुणी यू.पी.एस.सीचा अभ्यास करणारा नांगरे पाटील, तर कुणी गरज नसताना संपूर्ण गावाच्या सीआयडीपेक्षा जास्त खबऱ्या ठेवणारा ए.सी.पी.प्रद्युमन. अगदी त्या दुनियादारी सिनेमासारखा. अन परिस्थिती पण अशी कि आमचा जीव जीच्यापाशी तिचा मात्र भलत्यापाशीच. आम्ही सगळं कॉलेजभर तिच्या माग फिरलो, होते नव्हते ते सगळे रोड रोमियो बाजूला केले. पण बाजी भलतंच पाखरू मारून गेलं.   आज बऱ्याच वर्षांनी सर्वांची एकत्र भेट झाली. आमची मैत्री एवढी की एकमेकांच्या घरी जाण, ज्याच्या घरी गेलोय त्याच्या घरच्यांबरोबर मिळून मिसळून २-४ दिवस राहणं हे सर्व आमच्यासाठी नेहमीचंच. त्यादिवशी आमच्या एका मित्राची रीसेप्शन पार्टी होती. लग्न पळून जाऊन केल्यामुळं एकदम साध्या पद्धतीने झालं होतं आणि कुणालाच बोलावलंपण नव्हतं. त्याची सर्व कसर काढायला म्हणून कि काय पण पार्टीचं नियोजन एकदम जोरदार होतं. शाकाहारी मांसाहारी दोन्ही प्रकारचं जेवण होतं. एकटा शाकाहारी असल्यामुळं ग्रुपमधले सर्व जण

एक दिवस आठवणीतला

                परवा सहज तिला फोन केला.. येतोय पुण्यात कामानिमित्त. त्यावेळी नेमका तिचा एम.पी.एस.सी.चा पेपर होता.. आणि नंबर आला होता भोरला.. ती तिच्या बाबांना बोलावणार होती पेपरला जायला.. मोकळा असल्यामुळं मी म्हणलं "कशाला बाबांना एवढ्या लांब बोलावतीयेस. जाऊ ना आपण.. असही रविवारच आहे."         आता एवढ्या आत्मविश्वासाने मी पुढाकार घ्यायचं कारण म्हणजे मला वाटलं असं किती लांब असेल भोर.. २५-३०किमी.. अन एखादा पेपर ३ तासांचा.. आणि रमतगमत परत पुणे. पण आदल्या दिवशी कळलं की अंतर ५५किमी आहे, २ पेपर आहेत आणि वेळ १०.३०-५..             माझ्या मनात आता कालवाकालव सुरु झाली. प्रवासाचा कधीच कंटाळा नव्हता पण पंचाईत अशी होती कि दिवसभर करायचं काय?? १००% भोरमध्ये आपल्याला बोर होणार. आता मैत्रीण जवळची, त्यामुळं नाही म्हणायचा विषय येत नाही. आणि दिलेला शब्द माघारी घेणं रक्तात नाही. झालं. सकाळी ८-८.३०ला निघायचं ठरलं.. मनातली चलबिचल काही थांबायला तयार नव्हती. त्या परिस्थितीमध्ये घाईगडबडीत मनाची समजूत घालण्यासाठी २-३पिक्चर मोबाईल मध्ये भरून हेडफोन आणि पोर्टेबल चार्जर घेतला.. अन ठरल्याप्रमाणे नि