तो काळंच वेगळा असतो,
शेवटचं वर्ष सुरू होताना कॉलेजातून सुटकेचा आनंद शेवटच्या सत्रात काहीसा कमी कमी होत चाललेला असतो. प्रत्येक जण आपल्या भावी करियरबद्दल विचार करत असतानाच प्रियकरांचा न लाभलेलं प्रेम मिळवायचा शेवटचा प्रयत्न करायचा निर्धार झालेला असतो, इतर वेळी अशक्य वाटणारे शिक्षकवर्ग सबमिशनलाही त्रास देणं बंद करून टाकतात,
डिग्री संपेपर्यंत वर्गातील हाय हॅलो वाले मित्रही नकळत जवळ येऊन गेलेले असतात.
इतक्यात कोणीतरी म्हणतं - "अरर.. एकच महिना राहिला कॉलेज संपायला..!!"
सुटकेच्या आनंदावर थोडं विरजन पाडणारा हा पाहिला वार असतो.
आपल्या आपल्या ग्रुपच्या वर्गाच्या फेयरवेल पार्ट्या सुरू होतात.
४ वर्षांच्या आठवणी काढायचा दिवस असतो, डिग्री संपेपर्यंत कधी पाश्चिमात्य पेहरावात ना दिसलेली ती आज वनपीसवर मिरवत असते, तिला पाहून कधी स्टेजवर न गेलेल्या तोही त्यावेळी भाषण देऊन टाकतो..!
रोज नव्या कारणावरून कॉलेजला वाईट बोलणारी तोंडाच्या मनात त्याच कॉलेजबद्दल आस्था निर्माण व्हायला लागलेली असते.
जसा वेळ जाईल तसा राहिलेल्या असाईनमेंट करू, येणाऱ्या परिक्षेकडे लक्ष देऊ, करियर कडे बघू, की मित्रांबरोबर शेवटचे क्षण आनंदानं घालवू, ह्या विचारात गुर्फटलेला त्यांच्यातील तरुण एक गोंडस बाळ होऊन जातो. ज्या बाळाला हे सगळंच करायचं असतं पण वेळ अपुरा पडत असतो. कारण मनात चाललेल्या विचारांच्या कोलहलात पुन्हा ही लोकं भेटतील ह्याची शाश्वती कमी होत चाललेली असते.
अशा वेळी रोज कुणीतरी बिझनेस टाकू, आपण पुण्यात एकत्र राहू, कॉन्ट्री काढून चारचाकी घेऊ, एमपीएस्सी करू, दर आठवड्याला ट्रिप काढू, अशा गप्पांचा फड रंगवत १५-२० मिनिटात अवघ पुणे विकत घेत असतो.
अशा गदारोळात शेवटचा आठवडा उजाडतो.
इतर वेळी नेहमी परीक्षेच्या ताण घेऊन सैरभैर करणारी पाखरं अभ्यासापेक्षा हे ३-४वर्षांचं घर सुटणार ह्या विचाराने कोमेजून गेलेली असतात. इतर वेळी लायब्ररीच्या एका कोपऱ्यात बसून अभ्यास करणारा अभ्यासू मुलगा सर्वांना एकत्र घेऊन अभ्यास करत असतो, अन दिवसागणिक त्या अभ्यासाचं रूपांतर गप्पांच्या फडात होत गेलेलं असतं..
शेवटची परीक्षा संपल्यावर आपापल्या कुणी फटाके वाजवून आनंदी असल्याचं जगाला ओरडून सांगत असतो. पण मनात काहूर माजलेलं असतं ते शेवटच्या पाठवणीचं. एव्हाना वर्गातली ५०-६० लोक त्याचं कुटुंबातील सदस्य झालेले असतात, अन बॅच मधील इतर लोक पाहुणेमंडळी.
कुणाला आईवडील येऊन घेऊन जात असतात, कुणाला मित्रांचा गराडा सोडायला जात असतो, एखादा एकटाच कल्टी मारतो, तर एखादा कार्यकर्ता फक्त सगळ्यांना सोडायचा ड्युटीवर असतो.
पण निघताना प्रत्येक जणाच्या मनात दुःखाचा लाटांनी पूर आलेला असतो. तरी त्याने हसत आणि सगळ्यांना हसवत सगळ्यांचा निरोप घेत त्या पुराला बांधावरच अडवलेलं असतं. पण जसा परतीचा प्रवास सुरु होईल तसं डोळ्यापर्यंत आलेला अश्रूंचा बांध फुटलेला असतो. त्या अश्रूंच्या धारेपरलीकडं डोळ्यासमोर सगळ्यांना सोडून एक नवीन आयुष्य दरवाजा ठोठावत असतं जिथं त्याला त्याची लढाई फक्त एकट्याला लढायची असते..!!!
- वृषाल शब्दातला
+91 7798809900
शेवटचं वर्ष सुरू होताना कॉलेजातून सुटकेचा आनंद शेवटच्या सत्रात काहीसा कमी कमी होत चाललेला असतो. प्रत्येक जण आपल्या भावी करियरबद्दल विचार करत असतानाच प्रियकरांचा न लाभलेलं प्रेम मिळवायचा शेवटचा प्रयत्न करायचा निर्धार झालेला असतो, इतर वेळी अशक्य वाटणारे शिक्षकवर्ग सबमिशनलाही त्रास देणं बंद करून टाकतात,
डिग्री संपेपर्यंत वर्गातील हाय हॅलो वाले मित्रही नकळत जवळ येऊन गेलेले असतात.
इतक्यात कोणीतरी म्हणतं - "अरर.. एकच महिना राहिला कॉलेज संपायला..!!"
सुटकेच्या आनंदावर थोडं विरजन पाडणारा हा पाहिला वार असतो.
आपल्या आपल्या ग्रुपच्या वर्गाच्या फेयरवेल पार्ट्या सुरू होतात.
४ वर्षांच्या आठवणी काढायचा दिवस असतो, डिग्री संपेपर्यंत कधी पाश्चिमात्य पेहरावात ना दिसलेली ती आज वनपीसवर मिरवत असते, तिला पाहून कधी स्टेजवर न गेलेल्या तोही त्यावेळी भाषण देऊन टाकतो..!
रोज नव्या कारणावरून कॉलेजला वाईट बोलणारी तोंडाच्या मनात त्याच कॉलेजबद्दल आस्था निर्माण व्हायला लागलेली असते.
जसा वेळ जाईल तसा राहिलेल्या असाईनमेंट करू, येणाऱ्या परिक्षेकडे लक्ष देऊ, करियर कडे बघू, की मित्रांबरोबर शेवटचे क्षण आनंदानं घालवू, ह्या विचारात गुर्फटलेला त्यांच्यातील तरुण एक गोंडस बाळ होऊन जातो. ज्या बाळाला हे सगळंच करायचं असतं पण वेळ अपुरा पडत असतो. कारण मनात चाललेल्या विचारांच्या कोलहलात पुन्हा ही लोकं भेटतील ह्याची शाश्वती कमी होत चाललेली असते.
अशा वेळी रोज कुणीतरी बिझनेस टाकू, आपण पुण्यात एकत्र राहू, कॉन्ट्री काढून चारचाकी घेऊ, एमपीएस्सी करू, दर आठवड्याला ट्रिप काढू, अशा गप्पांचा फड रंगवत १५-२० मिनिटात अवघ पुणे विकत घेत असतो.
अशा गदारोळात शेवटचा आठवडा उजाडतो.
इतर वेळी नेहमी परीक्षेच्या ताण घेऊन सैरभैर करणारी पाखरं अभ्यासापेक्षा हे ३-४वर्षांचं घर सुटणार ह्या विचाराने कोमेजून गेलेली असतात. इतर वेळी लायब्ररीच्या एका कोपऱ्यात बसून अभ्यास करणारा अभ्यासू मुलगा सर्वांना एकत्र घेऊन अभ्यास करत असतो, अन दिवसागणिक त्या अभ्यासाचं रूपांतर गप्पांच्या फडात होत गेलेलं असतं..
शेवटची परीक्षा संपल्यावर आपापल्या कुणी फटाके वाजवून आनंदी असल्याचं जगाला ओरडून सांगत असतो. पण मनात काहूर माजलेलं असतं ते शेवटच्या पाठवणीचं. एव्हाना वर्गातली ५०-६० लोक त्याचं कुटुंबातील सदस्य झालेले असतात, अन बॅच मधील इतर लोक पाहुणेमंडळी.
कुणाला आईवडील येऊन घेऊन जात असतात, कुणाला मित्रांचा गराडा सोडायला जात असतो, एखादा एकटाच कल्टी मारतो, तर एखादा कार्यकर्ता फक्त सगळ्यांना सोडायचा ड्युटीवर असतो.
पण निघताना प्रत्येक जणाच्या मनात दुःखाचा लाटांनी पूर आलेला असतो. तरी त्याने हसत आणि सगळ्यांना हसवत सगळ्यांचा निरोप घेत त्या पुराला बांधावरच अडवलेलं असतं. पण जसा परतीचा प्रवास सुरु होईल तसं डोळ्यापर्यंत आलेला अश्रूंचा बांध फुटलेला असतो. त्या अश्रूंच्या धारेपरलीकडं डोळ्यासमोर सगळ्यांना सोडून एक नवीन आयुष्य दरवाजा ठोठावत असतं जिथं त्याला त्याची लढाई फक्त एकट्याला लढायची असते..!!!
- वृषाल शब्दातला
+91 7798809900
Ryt sir..👍👍👍
ReplyDeleteधन्यवाद
DeleteChan !
ReplyDeleteEk number 👍👍
ReplyDeleteTouching
ReplyDeleteHo sir...
ReplyDeleteGood good.
ReplyDeleteMost touching.. Emotions truly described!!
ReplyDeleteछान ....आमचा शेवटचा आठवडा आठवला...😊
ReplyDeleteKamaal lihlay..!
ReplyDeleteKhup Bhari Vrushali 👌🏼
ReplyDeleteSuperb👌👌👍
ReplyDeleteWow. Saheb ..... Ekdam Sundar
ReplyDeleteRemembering college days 🎀
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDelete